प्रा. माया मुळे (समन्वयक साऊ ट्रस्ट) यांचे मार्गदर्शन
कळंब
तालुक्यातील पाथर्डी येथे साऊ एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
एकल महिलांच्या विविध समस्या, त्यांच्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः महिलांना सामाजिक, आर्थिक आणि शासकीय पातळीवर भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बालसंगोपन योजना, राजीव गांधी निराधार पेन्शन योजना तसेच इतर शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि संबंधित अडथळ्यांबाबतही उपस्थित महिलांना समजावून सांगण्यात आले. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी रोजगार निर्मिती, स्वयंरोजगाराच्या संधी, बचत गटांद्वारे आर्थिक सक्षमीकरण आणि कौशल्यविकास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीचे नियोजन गावचे सरपंच नाना तुकाराम पिंगळे आणि पोलीस पाटील बालाजी चिंचकर यांनी केले असून त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. प्रा. माया मुळे (समन्वयक, साऊ ट्रस्ट) यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
राज्य समन्वयक हेरंब कुलकर्णी आणि जिल्हा समन्वयक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमामुळे महिलांमध्ये शासकीय योजनांविषयी जागरूकता वाढली असून त्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळाली.









