धाराशिव
जिल्ह्यातील ऊर्जा पायाभूत सुविधांना मोठी चालना देणारे पाऊल टाकत Serentica Renewables कंपनीने २२० के.व्ही. क्षमतेच्या EHV वीजवाहिनीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले असून चार्जिंगही सुरू केले आहे. या प्रकल्पाअंतर्गत १४ किमी लांबीची वीजवाहिनी उभारण्यात आली आहे. पारा, सरोळा मांडावा, सेलू, पिंपळवाडी, दहिफळ आणि तांडुळवाडी ही गावे या वाहिनीच्या कक्षेत आली आहेत.
प्रकल्प राबवताना अनेक तांत्रिक आणि स्थानिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र कंपनीच्या पथकाने स्थानिक नागरिकांशी सातत्याने संवाद साधत समन्वयाने काम पूर्ण केले. या प्रक्रियेत शेतकरी, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
पारा येथील आदिवासी पारधी समाजातील शेतकरी वसंतराव काळे यांनी कंपनीबद्दल समाधान व्यक्त करत जमीन मोबदला आणि नुकसानभरपाईचे प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवण्यात आल्याचे सांगितले. सारोळा मांडवा येथील शेतकरी सखाराम मोरे यांनीही कंपनीचे आभार मानत सुरू केलेल्या टोल फ्री हेल्पलाईन (१८०० २०२ ८७३५) उपक्रमाचे कौतुक केले. शेतकऱ्यांनी आपले प्रश्न हेल्पलाईनवर मांडावेत, असे त्यांनी आवाहन केले.
धाराशिव जिल्हा पारंपरिक ऊर्जापद्धतीतून स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेकडे वाटचाल करत आहे. जिल्ह्यात उभे राहत असलेले पवन आणि सौर ऊर्जा प्रकल्प स्थानिक विकासाला चालना देत असून राज्याच्या हरित ऊर्जा क्षमतेला नवे बळ देत आहेत. अनुकूल भूगोल आणि वाढती गुंतवणूक लक्षात घेता धाराशिव भविष्यात महत्त्वाचे हरित ऊर्जा केंद्र ठरण्याची क्षमता बाळगून आहे.
या प्रकल्पासाठी तहसीलदार आणि उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रशासकीय स्तरावर सहकार्य केले. स्थानिक पोलीस निरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक ती मदत देत काम सुरळीत पार पाडण्यास हातभार लावला.
चौकट
अडिच वर्षात काम पूर्ण
चौकट
पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जानिर्मिती
या EHV वीजवाहिनीचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे अडीच वर्षांचा कालावधी लागला. सप्टेंबर २०२३ मध्ये कामाला सुरुवात झाली आणि ३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकल्प पूर्णत्वास गेला. त्यानंतर ४ फेब्रुवारी २०२६ रोजी वीजवाहिनीचे चार्जिंग यशस्वीरीत्या सुरू करण्यात आले. या प्रकल्पामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे.
कंपनी स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि नागरिकांशी समन्वय साधत जबाबदारीने विकासकामे राबवत आहे. धाराशिव जिल्ह्यात वाशी, भुम आणि कळंब तालुक्यात सुमारे ५ बिलियन युनिट्स हरित ऊर्जा निर्मितीसाठी पवनचक्की प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जानिर्मितीचा ध्यास घेत कंपनी विविध सामाजिक उपक्रमही राबवत आहे.










