प्रतिनिधी
खड्ड्यांनी पोखरलेले रस्त्याचा प्रश्न विधानसभेत धडकला असून आमदार कैलास घाडगे पाटील यांनी प्रशासनावर हल्ला बोल केला.
अखेर खड्डेमय आणि अर्धवट रस्त्यांचा जळजळीत प्रश्न थेट विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात धडकला. हजारो नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिल्यानंतर आमदार कैलास घाडगे पाटील यांनी हा विषय पुरवणी मागण्यांत जोरदारपणे उचलला आणि प्रशासनाला आरशात उभं केलं.
मंजूर कामे अर्ध्यावर का थांबवली, असा थेट सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. यावर मिळालेलं उत्तर म्हणजे नागरिकांची थट्टाच. बिल मिळत नाही म्हणून कंत्राटदार काम करत नाहीत, असा पोकळ खुलासा करण्यात आला. म्हणजे जनता रोज जीव मुठीत घेऊन खड्ड्यांतून प्रवास करेल, पण कागदावर सही नसेल तर प्रशासन आणि कंत्राटदार दोघेही हातावर हात धरून बसतील. हे नेमकं कोणासाठीचं शासन आहे, असा रोखठोक सवाल आमदारांनी उपस्थित केला.
येडशी–मोहा–कळंब, गोविंदपूर–खामसवाडी–मोहा, कळंब–भोगजी आणि कोल्हेगाव–शिराढोण या मार्गांवरील अर्धवट कामांचा मुद्दा उचलत त्यांनी स्पष्ट सांगितले की आता या खेळखंडोब्याला थांबवलेच पाहिजे. नागरीकांच्या सहनशक्तीचा










