कळंब (प्रतिनिधी )गेल्या अनेक महिन्या पासून कळंब शहराची स्वच्छता केली जात नाही,सगळीकडे नाल्या तुंबलेल्या आहेत,रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने त्यात पाणी साचल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असून, नगर परिषदेला वेळोवेळी तक्रारी करून ही याची जाणूनबुजून दखल घेतली जात नसल्याने ,गांधी नगर, सावरगाव पुनर्वसन या भागातील खड्ड्यात साचलेल्या पाण्याचे जलपूजन करून , गांधीगिरी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.या नंतर ही न. प. ने दखल न घेतल्यास कचरा मुख्याधिकारी यांच्या दालनात टाकण्याचा इशारा माजी नगरसेवक सतीश टोणगे यांनी दिला आहे.
कळंब शहरात नगर परिषदेच्या दुर्लक्ष मुळे ,घाणीचे साम्राज्य पसरले आहे.या मुळे साथीच्या रोगाचा फैलाव होऊ लागला आहे.मोठे खड्डे पडल्याने,व त्यात पाणी साचल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे जलपूजन करून न. प.प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
गांधी नगर, सावर गाव पू या भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर खड्डे पडले असून, त्यात पाणी साचल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या कडे नगर परिषद प्रशासना चे लक्ष वेधण्या साठी जलपूजन करून निषेध नोंदवण्यात आला.
रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्याचे जलपूजन करताना मा. नगरसेवक सतीश टोणगे, शुभम राखुंडे, पंकज दीक्षित, बाजीराव वाघमारे, मारुती माने, बापू दिगे,यांच्या सह या भागातील नागरिक उपस्थित होते.











