कळंब
हवामान विभागाकडून धाराशिव जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
दोन दिवस पावसाने थोडी उसंत दिल्यानंतर पुन्हा पाऊस जोरदार कोसळू लागला आहे. शनिवारी मध्यरात्री अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून नद्यांनी पुन्हा धोक्याची पातळी गाठली आहे.
हवामान विभागाने २७ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संभाव्य मुसळधार पावसाचा इशारा देत, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांना २७ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.











