कळंब
नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा मोठा विस्फोट झाला आहे. प्रारूप मतदार याद्यांमधील गंभीर गोंधळामुळे नागरिक, नेते आणि राजकीय पक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळाने निवडणूक निर्णय अधिकारी यादव यांची भेट घेणार आहे. या भेटीत हरकती, तक्रारी आणि दुरुस्ती संदर्भातील पुरावे सादर केले जाणार आहेत.
नगर पालिका निवडणूक रंगत आली आहे, मात्र भावी नेत्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला आहे. याचे कारण म्हणजे प्रारूप मतदार याद्यांमधील गोंधळ हेच मुख्य कारण ठरले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गोंधळ मतदारांचे वास्तव्य, प्रभागांचे सीमांकन आणि नोंदी या निवडणुकीतील महत्त्वाच्या बाबी असूनही प्रशासनाने यामध्ये गंभीर दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. काहींची नावे मूळ प्रभागातून वगळली गेली आहेत. त्यामुळे प्रारूप मतदार याद्यांच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित होत आहे. दहा प्रभागांतून तब्बल ३२३९ आक्षेप नगर पालिकेत आले आहेत. याची स्थळ पाहणी झाली असून आता ही प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम मतदार यादी कशी बनवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिका प्रशासन याबाबत कमालीची गुप्तता पाळत असल्यामुळे नेत्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिकाऱ्यांची भेट घेणार
निवडणूक निर्णय अधिकारी यादव (धाराशिव) हे २८ ऑक्टोबर रोजी कळंब उपविभागीय कार्यालयात येणार असून, या भेटीत माजी नगरसेवक व पक्षप्रमुख मतदार याद्यांवरील हरकती आणि दुरुस्ती संदर्भात पुरावे सादर करणार आहेत. मात्र अधिकारी हे न आल्यामुळे भेट होऊ शकली नाही,
विश्वासाला तडा…
मतदार याद्यांचा गोंधळ निवडणुकीपूर्वीच जनतेच्या विश्वासाला तडा देणारा ठरला असून, आगामी काळात या मुद्द्यावरून प्रशासनाला चांगलेच घाम फोडावे लागतील, हे निश्चित आहे.










