Tuesday, November 4, 2025
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण    📰कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल    📰“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”    📰कळंब नगर पालिकेच्या मतदार याद्यांतील गोंधळ अखेर संपला.    📰फक्त काही दिवसांत मोठा पराक्रम! धाराशिव पोलिसांनी उघडकीस आणली 2 कोटींची चोरी उघडकीस, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचा पोलिसांना गौरव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमीनी व फळबांगांना पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा आमदार . कैलास पाटील यांची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे

लोकाभिमान by लोकाभिमान
October 18, 2025
in Uncategorized
A A
0
0
SHARES
5
VIEWS

धाराशिव ता. 18: सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडुन गेलेल्या जमीनी व फळबांगांना महसुल, कृषी विभागाने केलेल्या पंचनामा,नुकसान प्रकार आणि प्रमाण यानुसार वाढीवची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केल्याची माहिती जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली आहे.
जिल्हयासह राज्यातील 31 जिल्हयामध्ये जुलै ते ऑगस्ट मध्ये मोठया प्रमाणात अतिवृष्टी आणि सततचा पावसाचे पाणी साठल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद, मुग, मका, कापुस पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे होऊन महसुल, कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याच्या आधारे शासनास नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर शासनाकडुन मदत जाहीर करण्यात आली. मात्र त्यानंतर सप्टेंबर मध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली ऑगस्टमध्ये फक्त पिकाचे नुकसान झाले होते परंतु सप्टेंबर मध्ये त्याच पिकाखालची जमीन खरडुन गेली. त्यामुळे ऑगस्ट पेक्षा सप्टेंबर मध्ये शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी, पुरस्थिती, चक्रीवादळ, या सारख्या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्याने पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरुपात एका हंगामात एकवेळेस या प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधुन विहीत दराने मदत देण्यात येते.मात्र धाराशिव जिल्हयासह राज्यातील 31 जिल्हयामध्ये जुलै-ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे होऊन नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडे अहवाल सादर झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये त्याच पिकाखालील जमीन खरडुन गेल्याने शासन निर्णयाच्या निकषानुसार एका शेतकऱ्याला एका हंगामामध्ये दुसरी मदत मिळण्यास अडचणीचे ठरणार आहे. ऑगष्टमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यामध्ये पिकाचे सर्वच नुकसान झाल्याने अल्पभुधारक शेतकऱ्याचे सर्वच क्षेत्र नुकसानग्रस्त म्हणुन दाखवले होते.
परंतु सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने जमीन खरडुन गेल्याने संबंधित शेतकऱ्यांची शेतजमीन व शेतीपिके यांचे एकत्रीत नुकसान दाखवण्यासाठी शेतजमीन शिल्लक नाही. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होणार आहे. त्याचबरोबर जुलै ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत असताना कोरडवाहु जमीनीवरील पिकांचे पंचनामे झाले आहेत परंतु सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फळबागांचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांचेही पंचनामे महसुल,कृषी विभागाने केलेले आहेत. त्या पंचनाम्यानुसार सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीने खरडुन गेलेल्या जमीनी व फळबांगानाही नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे जे नुकसान ऑगस्ट च्या तुलनेत तीव्र आहे.त्यामुळे आमदार कैलास पाटील यांनी मदत व पुन र्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी केली आहे अशी माहिती जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली आहे.

Tags: MLA Kailas Ghadge Patil's emotional appeal to farmers
Previous Post

रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीतर्फे ‘नेशन बिल्डर पुरस्काराचे’ थाटात वितरण; सात शिक्षकांचा गौरव

Next Post

स्वप्नपूर्ती महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे उद्घाटन इटकुर येथे उत्साहात संपन्न

Related Posts

Uncategorized

प्रसिद्ध कथाकार भास्कर चंदनशीव यांचे निधन

September 28, 2025
Uncategorized

.. चला, पुन्हा उभारी घेऊ ..
आ. कैलास घाडगे पाटील यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन

September 26, 2025
Uncategorized

सरूताईंच्या जात्यावरील ‘ओव्या’ अन् भुमिपुत्रांनी शब्दांत गुंफलेली ‘आभाळमाया’…

March 20, 2025
Uncategorized

कळंब शहरात बुधवारी जिजाऊ रथ याञेचे आगमन

March 20, 2025
Uncategorized

मराठवाड्याच हक्काच पाणी ; त्यात धाराशिवचे स्थान निश्चित करा

March 20, 2025
Uncategorized

पंचेवीस वर्षानंतर विद्याभवन हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा जुन्या आठवणीना मिळाला उजाळा

November 6, 2024
Next Post

स्वप्नपूर्ती महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे उद्घाटन इटकुर येथे उत्साहात संपन्न

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब नगरसेवक आरक्षण जाहीर; दिग्गजांचे गणित बिघडले, नव्या चेहऱ्यांना संधी!

    0 shares
    Share 0 Tweet 0

संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण

November 2, 2025

कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल

November 1, 2025

“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”

November 1, 2025
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!