Tuesday, November 4, 2025
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण    📰कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल    📰“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”    📰कळंब नगर पालिकेच्या मतदार याद्यांतील गोंधळ अखेर संपला.    📰फक्त काही दिवसांत मोठा पराक्रम! धाराशिव पोलिसांनी उघडकीस आणली 2 कोटींची चोरी उघडकीस, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचा पोलिसांना गौरव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

.. चला, पुन्हा उभारी घेऊ ..
आ. कैलास घाडगे पाटील यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन

लोकाभिमान by लोकाभिमान
September 26, 2025
in Uncategorized
A A
0
0
SHARES
162
VIEWS


कळंब
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले आहे. कोरड्या दुष्काळापासून ओल्या दुष्काळापर्यंत आणि महाप्रलयकारी भूकंपापर्यंत झालेल्या जीवितहानीचा दाखला देत त्यांनी खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

“१९७२ च्या दुष्काळाच्या झळा सोसलेल्या, १९९३ च्या भूकंपातून पुन्हा उभारी घेतलेल्या आपण माणसं आहोत. जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या त्या संकटानंतरही आपण धैर्याने उभं राहिलो. आपल्या वडीलधाऱ्यांनी त्या झळा सहन केल्या, त्यातून लढा दिला, आणि आज आपणही अतिवृष्टी व महाप्रलयाच्या संकटातून नवी ताकद घेऊन उभं राहू,” असे त्यांनी सांगितले.

१९७२ च्या दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त झाले, गावोगावी पाणी आणि अन्नाचा तुटवडा निर्माण झाला. तर १९९३ च्या भीषण भूकंपाने धाराशिव-लातूर परिसरात हजारो जीव गेले, लाखो लोक बेघर झाले. त्या वेदनादायी आठवणी अजूनही डोळ्यांसमोर आहेत. मात्र, या संकटातूनही लोकांनी पुन्हा धैर्याने उभारी घेतली.

आज अतिवृष्टीने गावोगावी हाहाकार माजवला आहे. नदीकाठची गावे जलमय झाली, शेतं-घरे वाहून गेली, शेकडो कुटुंबे उघड्यावर आली. पण या काळात आपण सारे एकत्र राहून, एकमेकांना आधार देत, पुन्हा नव्याने उभे राहायचे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“आपल्या मातीतून शिकलेली ताकद आणि संघर्षाची परंपरा आपल्याला कधीच हरू देणार नाही. या वेळी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि समाजातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली तर नक्कीच आपण पुन्हा उभं राहू. आपली माती, आपला माणूस पुन्हा बहरेल. हाच खरा विजय आहे,” असेही आवाहन आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केले.

Tags: MLA Kailas Ghadge Patil's emotional appeal to farmers
Previous Post

पुरग्रस्तांची थट्टा; शेतकरी आत्महत्या करतोय, कलेक्टर मात्र नाचतायतं

Next Post

धाराशिवमध्ये रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

Related Posts

Uncategorized

सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमीनी व फळबांगांना पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा आमदार . कैलास पाटील यांची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे

October 18, 2025
Uncategorized

प्रसिद्ध कथाकार भास्कर चंदनशीव यांचे निधन

September 28, 2025
Uncategorized

सरूताईंच्या जात्यावरील ‘ओव्या’ अन् भुमिपुत्रांनी शब्दांत गुंफलेली ‘आभाळमाया’…

March 20, 2025
Uncategorized

कळंब शहरात बुधवारी जिजाऊ रथ याञेचे आगमन

March 20, 2025
Uncategorized

मराठवाड्याच हक्काच पाणी ; त्यात धाराशिवचे स्थान निश्चित करा

March 20, 2025
Uncategorized

पंचेवीस वर्षानंतर विद्याभवन हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा जुन्या आठवणीना मिळाला उजाळा

November 6, 2024
Next Post

धाराशिवमध्ये रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब नगरसेवक आरक्षण जाहीर; दिग्गजांचे गणित बिघडले, नव्या चेहऱ्यांना संधी!

    0 shares
    Share 0 Tweet 0

संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण

November 2, 2025

कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल

November 1, 2025

“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”

November 1, 2025
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!